आजकाल गोष्टी लिहायच्या असतील तर लहान मुलं आणि जिवंत असल्यास त्यांच्या आजी आजोबांवरच लिहाव्या लागतात , कारण आई बाबा तर पैश्याच्या मागे धावताना ट्रॅफिक मध्येच अडकलेले असतात . त्या मुळेच कि काय जाहिरातींमध्ये देखील म्हाताऱ्या किंवा अगदीच जन्माला आलेल्या बाळांचे प्रमाण वाढले आहे . आसों !
सकाळी अचानक लवकर उठल्यामुळे आजोबा इतक्या थंडीत बागेत व्यायाम करायला देखील जातात तेही मला सोडून हे तेजश्री ला प्रथम कळताच धक्का बसला . “ कुठे गेलेलात मला सोडून ? ” तिने बाहेरून येऊन बूट काढणाऱ्या आजोबांना निक्षून विचारले .
आजोबांना मात्र काही ऐकू गेले नाही वाटतं .
“ आजोबा ऐकू येत नाहीये का ? अहो कुठे गेलेलात ”
“ अरे वाह लवकर उठला माझा बोका ... ” अचानक तेजश्रीला पाहून आजोबा खुश झाले .
“ अहो पण मी काय विचारतीये तुम्ही कुठे गेला होतात मला सोडून ? ” तेजश्री असं त्यांना विचारात असतानाच आजोबांनी त्यांच्या कानातून हेडफ़ोन प्रमाने कापूस काढला “ हा आता बोल काय म्हणत आहेस तू ? ”
“ आईल्ला ! नवीन हेडफोन ? आजोबा तुम्ही बऱ्याच गोष्टी लपवायला लागले आहेत बरका ... वायरलेस दिसतोय ... बघू ”
“ अगं ए आधुनिक माकड ! कापूस आहे तो साधा ... ” तेजश्रीला कापूस म्हणजे कळालं नाही पण “ cotton cotton ” असं आजोबांनी सांगताच कळालं .
“ मला वाटलं हेडफोन आहेत . ह्या कॉटन चा काय उपयोग ? ” तेजश्रीने आजोबांना विचारलं .
आता पुढचा मीच सांगतो ... काही दिवसां पुरवी आजारी पडलो होतो ... तेव्हा आईने तिच्या कानात हेडफोन किंवा कापूस दोन्हीही नसताना कोणाचच न ऐकता माझ्या कानात कापूस टाकला (कोंबला) .
सतत कानात हेडफोन लावणारं आपलं वय आणि काय काका , आजोबा टाईप , कानात कापूस घालून हिंडायचं ? पण खरं सांगतो कानात कापुस म्हणजे स्वर्ग आहे स्वर्ग !
हेडफोन घातल्याने हाथ मोकळे राहतील ह्याच एका कारणाने ह्याचा शोध लागला पण ... कानां नंतर मनाच्या पडद्यावर किती भार पडला काय सांगावं !
कॉल , गाणी , रेडिओ , गाडी चालवताना , व्यायाम करताना , चालताना ... कायम कोणाचा ना कोणाचा , कश्याचा ना कश्याचा तरी आपल्या कानां मध्ये सतत चालू असणारा हा आवाज ... जर ! जर कधी मोबाइल ची बॅटरी संपली असेल , हेडफोन चा गुंता सोडवायचा कंटाळा आला असेल , किंवा हेडफोन हरवले असतील तरच हा कानात वाजणारा आवाज बंद होतो ! कानातल्या हेडफोन चा आवाज कमी ज्यास्त किंवा चालू बंद करता येतो ... पण कानातले हेडफोन काढले कि लोक , समाज, शिक्षक , घरातले ह्यांची किर किर ऐकावी लागते हे वेगळच दुखणं .
पण आपण ? आपला आवाज ? दोन गाण्यांच्या मध्ये असणाऱ्या मोकळ्या शांत वेळ तो आपला ! तो पण अगदी काही क्षण, नंतर नवीन गाणं त्याचं नवीन संगीत आपल्याला परत वेगळ्या जगात नेयला तयार असतं ! हेडफोन ने जगातले सर्व आवाज आपल्याला स्पष्ट ऐकवले पण आपलाच मनाचा आवाज आपल्याला आता त्याच्यामुळे स्पष्ट ऐकू येत नाही !
... आणि इथे ह्या बहिऱ्या होणाऱ्या शहरी कानांना वाचवायला काळ्या मातीतला ‘ढवळ सोनं ’ म्हणून ओळखला जाणारा कापूस येतो ! थंडी वाऱ्या पासून कानांना वाचवण्यासाठी कापूस खूप प्राचीन काळा पासून प्रसिद्ध आहे पण त्याच बरोबर कापूस आपल्या साठी शांतता आणतो ! ह्या आवाजाच्या दुनियेत कापूस कानात घालणे म्हणजे खरच स्वर्ग आहे स्वर्ग ! बरेच अनावश्यक आवाज बंद होतात , आपण स्वतःचा मनातला आवाज ऐकू लागतो , स्वतः सोबत संवाद साधू लागतो .... थोडक्यात सांगायचं म्हणजे आपण आपल्या मनात घर करून बसतो , ज्यात आपण आपलेच असतो , त्यात बाकी कोणाचा आवाज नसतो .
हेडफोन आणि कापूस ह्या दोन्ही चा अतिरेक झाल्यास कानांना हानिकारकच पण , आपण काय आणि कोणाचं ऐकतो आजकाल ? आणि माझं तरी काय तुम्ही ऐकणार ? पण खरंच कधीतरी हेडफोन घालून ठेका धरण्या पेक्षा कापूस घालून रम्य शांततेत स्वतःला शीळ घाला ! रोजच्या साच्या तुन बाहेरपडून असे मी तरी प्रयोग करत असतो !
Kadak ch bhau ... kharr tar aaj kal he praman vadhlay re jastach ... music lavtat nd saata samudra palikadchi kadhi na kalnari english songs aikt bastat.....
ReplyDeleteHahaha Thank you !
Delete